breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

पुणे |महाईन्यूज|

वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज ठाकरे आणि राज्यपालांच्या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसंच, राज ठाकरे यांना टोलाही हाणला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणे अयोग्य आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केली आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. कंगना राणावत प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं आहे. कंगना राणावतवर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी तिला समन्सही बजावले होते. मात्र, कंगनानं भावाच्या लग्नाचं कारण देत चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यावर संजय राऊत यांनी कंगनावर जोरदार टीका केली आहे. कंगना ही या प्रकरणातील संशयीत आरोपी आहे. ती मला शूर मुलगी आहे, असं वाटत होते. तिला पोलिसांनी समन्स बजावले आहेत. तिनं पोलिसांसमोर हजर राहावं, असं राऊतांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button