breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुसळधार पावसामुळे बटाटा उत्पादक शेतकरी संकटात

पुणे – कांदा उत्पादक शेतकऱ्यानंतर आता बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची ही चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्याभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने बटाट्याचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील बटाटा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने, काढणीसाठी आलेला बटाटा शेतातच सडू लागला आहे. बटाटा काढणी खर्चातही मोठी वाढ झाली आहे. कोरोना संकटाने मजूरांची टंचाई भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे बटाटे पावसामुळे शेतातच सडू लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button