‘संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात’; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबई | मविआचे जागावाटप रखडलेले असताना आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून जागावाटपाचा तिढा सोडवा, असे आवाहन केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत. अद्याप मविआमधील तीन पक्षांची भांडणे मिटलेली नाहीत. त्यांची भांडणे मिटलेली नसताना ते एकत्र जाणार की मैत्रीपूर्ण लढत देणार, याचा निकाल त्यांनी लावलेला नाही. त्याचा निकाल लागत नाही, म्हणून आम्ही काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधून काँग्रेस आणि आपण एकत्र लढू, असा प्रस्ताव दिला.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : सर्व्हेक्षण कामाच्या मोबदल्यापासून शिक्षक वंचित
I wrote a letter to Shri Mallikarjun Kharge on March 10, wherein I highlighted the telephonic conversation between Shri Ramesh Chennithala and I.
Taking into account the time left for elections, the lack of concurrence between INC and SS (UBT), and no finalisation of… pic.twitter.com/eYS1T3NgXe
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 12, 2024
रमेश चेन्नीथला यांनी आम्हाला कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे आता थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात आम्ही सर्व माहिती देण्यात आली आहे. मविआचे जागावाटप होत नाही, तोपर्यंत काँग्रेस आणि वंचितचे जागावाटप करून घेऊ, असा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र त्यालाही अद्याप काँग्रेस कार्यालयाकडून प्रतिसाद आलेला नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
खासदार नवनीत राणा या सर्वात मोठ्या लबाड आहेत. जातीचा दाखल्याबाबत त्यांनी बनावट कागदपत्रे दिले असल्याचे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे लवकरच नवनीत राणा तुरूंगात गेलेल्या दिसतील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.