लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव का झाला? विजय शिवतारेंनी सांगितलं कारण..
बारामतीची जागा अपक्ष म्हणून १ हजार टक्के जिंकली असती
पुणे | बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात होत्या. मात्र, सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना धोबीपछाड देत विजय खेचून आणला. अजित पवारांच्या मतदारसंघात सुप्रिया सुळेंना जवळपास दीड लाखांचे मताधिक्य आहे. दरम्यान, आता निकालानंतर विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव का झाला? याबाबत मोठं विधान केलं आहे.
विजय शिवतारे म्हणाले, महायुतीची जागा निवडून यावं असं सगळ्यांचं मत होतं, मी त्यावर बोलणार नाही. मी ही जागा १ हजार टक्के अपक्ष म्हणून जिंकली असती. कारण या दोघांनाही किती विरोध होता हे मला माहित होतं. इथं पक्ष नाही, इथे दोन प्रकारचे मत प्रवाह आहेत. एक पवार प्रो. आणि एक पवार विरोधी, लोकांना यांनाही आणि त्यांनाही मतदान करायचं नव्हतं.
हेही वाचा – सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार? रात्री उशिरा झालेल्या बैठकीत नाव फायनल
कोणाचही ऐकून जाहीर स्टेटमेंट देत असतील तर माझ्याकडे भरपूर माहिती आहे, पण मी तुमचा आदर करतो. तुम्ही कोणाचही ऐकून नका ना बोलू. विजय शिवतारेने जे काही केलं आहे ते सगळ्यांना माहित आहे. मी सगळं उघड-उघड केलं आहे, असंही विजय शिवतारे म्हणाले.