breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘..तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार नाही’; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपावाले एकदा का ४०० पार गेले की मग ते एक राष्ट्र एक निवडणूक घेतील. देशभरात त्यांच्या मनमानी कारभार सुरू होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते दापोलीत एका कार्यक्रमात बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट सांगितलं आहे की, भाजपाला देशाची राज्यघटना बदलायची आहे. त्यामुळेच त्यांना ४०० पार जायचं आहे (लोकसभेला ४०० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत). भाजपावाले एकदा का ४०० पार गेले की मग ते एक राष्ट्र एक निवडणूक घेतील. देशभरात त्यांचा मनमानी कारभार सुरू होईल.

हेही वाचा      –    शरद पवार गटात आज ३ मोठे पक्षप्रवेश होणार? ते तीन नेते कोण? 

आत्ता देशात महापालिका निवडणुका होत नाहीयेत. काश्मीरमध्ये चार-पाच वर्षांपासून विधानसभेची निवडणूक झालेली नाही. ही लोकसभा त्यांच्या घशात गेली तर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होईल की नाही ते सांगता येत नाही. ही एकच निवडणूक झाली की नरेंद्र मोदी दिल्लीत अध्यक्ष म्हणून बसतील. देशात अध्यक्षीय पद्धत सुरू करतील. मग ते सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्ये त्यांच्या मर्जीतल्या (न्यायपालिकेतल्या) लोकांना न्यायमूर्ती म्हणून नेमतील. रशियात पुतिनही तेच करतात. तसंच आपल्या देशातही पंतप्रधान न्यायमूर्तींची नेमणूक करण्यास सुरूवात करतील. तसेच देशात एकच निवडणूक घेतली जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपावाले जे काही करतायत ते आम्ही करू शकतो का? सर्वोच्च न्यायालयात आमचादेखील एक खटला चालू आहे. आम्ही न्यायमूर्तींशी संपर्क साधू शकतो का? आमच्यासाठी कोणी दारं उघडेल का? आम्ही जशी प्रत्येक गोष्टीची मर्यादा सांभाळतो तशी ते लोक का सांभाळत नाहीत. सध्या तरी आम्ही न्यायपालिकेवर विश्वास ठेवून आहोत, आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button