breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘ती’ एक खंत मनात कायम…; पराभवानंतर चंद्रहार पाटील मविआबाबत काय म्हणाले?

सांगली : अवघ्या महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर चंद्राहार पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रहार पाटील यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. सांगली विषयी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना, जे पक्ष असतील. त्यातील वरिष्ठांना माहित आहे. अपक्ष उमेदवार महाविकास आघाडीसोबत आल्याने आता सर्वकाही विसरून महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करू, असं चंद्रहार पाटील म्हणाले. ते सांगलीत टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

हेही वाचा     –      प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा! ईडीने जप्त केलेली १८० कोटींची मालमत्ता परत

महाराष्ट्रात ज्या 30 जागा निवडून आले. त्यात उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा राहिला. मात्र तीच गोष्ट सांगलीत बघायला मिळाली नाही, ही खंत एक उमेदवार म्हणून माझ्या मनात नक्कीच राहिल. बोलून दाखवण्यापेक्षा सर्व गोष्टी त्यांना माहित आहे की, आमचा पराभव कसा झाला? ते बोलण्यापेक्षा लोकांना माहिती आहे.पण ज्या मविआसाठी शिवसेना पक्षाने जे कष्ट केलं. त्याच शिवसेनेच्या उमेदवारासोबत ज्या काही गोष्टी सांगलीमध्ये घडल्या. त्या आम्हाला मनाला लागण्यासारख्या आहेत, असं चंद्रहार पाटील म्हणालेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button