breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

‘मोदी आणि माझे चांगले संबंध पण..’; शरद पवारांचं विधान चर्चेत

मुंबई | शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. पण त्यांची धोरणं मला पटत नाहीत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आहे. बारामती या ठिकाणी एका मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, मर्यादा आणण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा घालण्यात येत आहेत. आम्ही सांगेल तशी व्यक्ती नेमली तर हवा तसा निकाल येईल म्हणून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत मोदींनी बदल केला. राष्ट्रवादीची स्थापना मी केली. निवडणूक आयोगाने निकाल दिला की खरी राष्ट्रवादी शरद पवारांची नाही. ज्यांच्या हातात पक्ष दिला त्यांना विधीमंडळात मी आणलं होतं. काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक आहेत. ते वेळ देतात, कष्ट करतात.

हेही वाचा     –      CAA संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. पण त्यांची धोरणं मला पटत नाहीत. मोदी बारामतीत आले होते. त्यावेळी म्हणाले होते की माझं बोट धरून राजकारणात आले, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

संसद संस्था आपण जतन केली पाहिजे. मागे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात पंतप्रधान २४ मिनिटं आले. संसदेत बोलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही, असे असेल तर लोकशाही धोक्यात येईल. अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान संसदेत आहे, त्यांनी कधी असा विचार केला नाही. यातून असे दिसत की, या संस्थाबद्दल त्यांना आस्था वाटत नाही. डॉक्टरांचा आणि माझा फार संपर्क आलाय. त्यांना म्हणालो, माझं काम चालू द्या बाकी काय करायचं आहे ते करा. वकील आणि वैद्यकीय क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button