‘रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडं लावा’; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश
![Raj Thackeray said to plant trees in potholes on the road](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Raj-Thackeray-2-780x470.jpg)
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम दीड दशकांपासून सुरू आहे. अजूनही या महामार्गाचे काम पुर्ण झालेलं नाही. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करण्याचे आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की, ह्या राज्यातील कोणताही महामार्ग असो की शहरातील अंतर्गत रस्ते असो, सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. तेंव्हा ह्या खड्ड्यांमध्ये झाडं लावा, किमान ह्यामुळे तरी प्रशासनाचं रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे लक्ष जाईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – अमोल कोल्हेंच्या शिरूर लोकसभा मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा?
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की, ह्या राज्यातील कोणताही महामार्ग असो की शहरातील अंतर्गत रस्ते असो, सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. तेंव्हा ह्या खड्ड्यांमध्ये झाडं लावा, किमान ह्यामुळे तरी प्रशासनाचं रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे लक्ष जाईल. pic.twitter.com/izgV0Q4Khv
— Raj Thackeray (@RajThackeray) August 16, 2023
दरम्यान, मुंबई-गोवा रस्त्यावर आतापर्यंत 15 हजार 566 कोटी रुपये खर्च झाला आहेत. रस्ता नाही झाला बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. गडकरी यांच्याशी बोललो.. तर ते म्हणाले कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेले. यामागे काही कारण तर नाही ना.. कुणाचं काम तर नाही ना अशी शंका त्यांनी उपस्थित केली. कोकणातील जमिनी इतरांच्या घश्यात चालल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला. इथे कोणी जमिनी घेतल्या, कोणाच्या नावावर पाच हजार एकर जमीन घेतली. आपलीच लोक आहेत.. कुंपण शेत खातंय… आपल्या कोकणी लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात घालतात, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.