breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मणिपूरमधील ‘त्या’ घटनेवरून राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले..

मुंबई : मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ मे रोजी मणिपूरमधील थौबाला जिल्ह्यात ही घटना घडली आहे. संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या घटनेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांनी एक ट्वीट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आणि हेच दुर्दैव आहे.

हेही वाचा – Pune : मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button