‘राहुल गांधींना अपात्र ठरवणे म्हणजे लोकशाही संपवणे’; पृथ्वीराज चव्हाण
लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत संकल्प सत्याग्रह केला. यावेळी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप आदी नेते सत्याग्रहात सहभागी झाले होते.
राहुल गांधींना अपात्र ठरवणे म्हणजे लोकशाही दुखावणे आणि संपवणे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा आमचा शांततामय सत्याग्रह आहे. पुढील कारवाईचा मार्ग ठरवला जाईल…आम्ही या कारवाईविरुद्ध कायदेशीररित्या अपील करू (अपात्रता), आणि कायदेशीर लढाई लढली जाईल. राजकीय लढाई सुरूच राहील, तुम्ही पाहू शकता, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॉलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. नीरव मोदी, ललीत मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात? या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.