‘पंतप्रधान मोदी दुसऱ्यांकडून भ्रष्टाचार करून घेतात’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेंबांधणी सुरू केली आहे. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार करत नाहीत. परंतु, ते दुसऱ्यांकडून करून घेतात, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोल्यात बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी घोषणा करतात की ना खाऊंगा, ना खाने दुंगा. (मी भ्रष्टाचार करणार नाही, दुसऱ्यालाही करू देणार नाही). आपल्याला काय वाटतं, याने बायको सोडून दिली आहे. मुलंही नाहीत. मग कोणासाठी कमावणार? आपल्यालाही खरं वाटतं. की एकटाच आहे, हा एकटाच आहे तर कमवणार कोणासाठी? आगे पिछे कोणीच नाहीय. आणि म्हणून आपल्याला विश्वास वाटतो का बाबा खरं बोलतो.
हेही वाचा – ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य लोककल्याणकारी’; आयुक्त शेखर सिंह
या बाबाचं खाणंही वेगळं आहे. तो खात नाही (लाच घेत नाही किंवा भ्रष्टाचार करत नाही) हे सर्टिफिकट मी तुम्हाला देतो. पण तो दुसऱ्यांना खिलवतो हे लक्षात घ्या. तो स्वत: खात नाही, तो दुसऱ्यांना खिलवतो आणि दुसऱ्यांना खिलवून झालं की त्यांना म्हणतो की अर्ध मला, असा आरोप आंबेडकरांनी केला.
प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी ते म्हणाले, भाजपा व आरएसएस दोन्ही असे म्हणतात की आम्ही हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहोत. देशात बहुसंख्य पूर्णपणे हिंदू आहेत. मग धार्मिक राजकारण कशासाठी असा आमचा प्रश्न आहे. त्याचा खुलासा होत नाही. गत दहा वर्षात ज्या कारवाया झाल्या त्यातून इतिहासातील हे भांडण असल्याचे दिसते. संतांनी जी मांडणी केली ती व्यक्ती व सामूहिक स्वातंत्र्याची आहे. वैदिक धर्मातील जी सामाजिक मांडणी आहे ती व्यक्तिस्वातंत्र्य तसेच सहजीवन नाकारणारी आहे. यातून संतांच्या विचारावर आधारित जे संविधान आहे. त्याविरोधात भाजप व आरएसएस या ठिकाणी दिसते, असंही ते म्हणाले.