‘केंद्रातील सत्ता गेल्यानंतर नरेंद्र मोदी तुरूंगात जाऊ शकतात’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. कर्नाटक, केंद्रातील सत्ता गेल्यावर नरेंद्र मोदी सुद्धा तुरूंगात जाऊ शकतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते पिंपरीत वडार समाजाचा मेळाव्यासाठी ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यामांशी संवाद साधला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राजकारणात चोरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पकडत आहेत. मात्र, त्यांचं पकडणे मी गैर मानतो. कारण, पकडल्यावर ती प्रकरणे पूर्णत्वास जात नाहीत. तीन चार वर्षे कारागृहात ठेवून भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं. हे मानसिकतेवर आघात करण्याचं धोरण आहे.
हेही वाचा – ‘द केरळ स्टोरी’ सिनेमावरून जितेंद्र आव्हाड आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटरवॉर
त्यामुळे कर्नाटक आणि केंद्रतील सत्ता गेल्यानंतर नरेंद्र मोदीही तुरूंगात जाऊ शकतात. जे काही पेरलेले असते, तेच उगवते. म्हणून मोदींनी जे पेरलं आहे, तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होईल, असं प्रकास आंबेडकर म्हणाले.
पोस्कोचा गुन्हा दाखल झाल्यावर तातडीने अटक होते. मात्र, गुन्हा दाखल होऊनही ब्रिजभूषण सिंह यांना अटक झाली नाही. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. आता तुमचा प्रश्न मिटला असे न्यायाधीशांनी म्हणणे चुकीचे आहे. पोस्कोचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला कधी पकडणार हे न्यायालयाने विचारलं पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.