‘गढूळ परिस्थितीला मी वैतागले, कंटाळले होते’; पंकजा मुंडे यांचं विधान चर्चेत
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची ‘शिवशक्ती’ यात्रा बीड जिल्ह्यात पोहचली आहे. राज्यातील विविध भागांचा दौरा पंकजा मुंडे करत आहेत. पंकजा मुंडे यांची ‘शिवशक्ती’ यात्रा बीडमधील पटोदा येथे पोहोचली. तेव्हा त्यांनी मोठं विधान केलं आहे. गढूळ परिस्थितीला मी वैतागले, कंटाळले होते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी घरी बसले नव्हते. गढूळ परिस्थितीला वैतागले होते. काही बोलायलं गेलं, तर दुसरंच चालवलं जायचं. माझ्या मागे बरेच प्रश्न होते. ते सोडवण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या अडचणी आणि बरेच प्रश्न आहेत. जमेल तसे तेही प्रश्न सोडवू.
हेही वाचा – भावी मुख्यमंत्री बॅनरवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, जयंत पाटील आणि सुप्रिया..
पंकजा मुंडे राजकारणात काय करेन, काय नाही करेन. पण, कधीही असत्य, असंवैधानिक आणि तत्वाला सोडून काम करू शकत नाही. मी रणांगणात उतरले आहे. हे रन रखरखतं आहे. काहीजण मला ‘अहंकारी’ म्हणतात. मात्र, माझ्या मनात किंचीतही अहंकार नाही. मी ग्रामपंचायत सदस्य देखील नाही. मला तुमचा (जनतेचा) गर्व आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.