कोल्हापूरकरांचा ‘हात काँग्रेस के साथ’ : १५ व्या फेरीअखेर जयश्री जाधव १५ हजार मतांनी आघाडीवर !
कोल्हापूर : पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजपचे सत्यजित कदम यांच्यावर सातत्याने १५ फेऱ्यांपर्यंत आघाडी राखली. पंधराव्या फेरीत तब्बल १४ हजार ९३८ मतांची आघाडी घेतली.
जाधव यांनी पहिल्या फेरीतच 2719 मतांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीतही जाधव यांना 5515 कदम 2513 यांना मते मिळाली. जाधव यांना 3002 ची आघाडी मिळून एकूण लीड 5139 झाले. विजयाच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली.
पहिल्या फेरीत 7781 मतदान मोजून झाले. मोजायची मते 1,70,761 आहेत. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना 4586 तर भाजपचे सत्यजित कदम यांना 2719 मते मिळाली होती. दुपारी 12 पर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे. काॅंग्रेसच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात चुरस आहे. 15 उमेदवार रिंगणात आहेत.
सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी केवळ 61.19 टक्के मतदान झाले.
निकालापूर्वीच अभिनंदनाचे बॅनर…
एकाबाजूला ही मतमोजणी सुरु असून निकाल येण्यास अद्याप तीन तास आहेत. त्यापूर्वीच कोल्हापूर शहराच्या अनेक भागांमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स देखील लागले आहेत. या बॅनरवर काँग्रेस नेते आणि कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा उल्लेख किंगमेकर असा करण्यात आला आहे. तर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील यांचाही फोटो या बॅनरवर दिसून येत आहे.