औरंगाबाद, उस्मानाबादनंतर अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याची भाजप आमदाराची मागणी
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर होणारच..
मुंबई : औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण धाराशिव करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. यानंतर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याची मागणी केली आहे.
अहमदनगर हे शहर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान आहे, त्यामुळे अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर करावं, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर होणारच..असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी ट्वीट मध्ये महटलं आहे की, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा. देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात होणारच…असा विश्वास व्यक्त केला.