“चुना आयोगाने” परत आपण भाजपाच्या दावणीला बांधल्या गेल्याचे सिद्ध झाले: आमदार अमोल मिटकरी
मुंबई : “चुना आयोगाने” परत आपण भाजपाच्या दावणीला बांधल्या गेल्याचे सिद्ध केले.राष्ट्रवादी पक्ष ताकदीने लढणारा पक्ष आहे.नव्या ताकदीने उभारी घेऊ. तूर्तास टिवटिव करणाऱ्या लावारीस कार्ट्याना काही दिवस चुना आयोगाने आसुरी आनंद घ्यायला संधी दिली, अशी टीका राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि पश्चिम बंगाल मधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस’ या दोन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने तशी घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा कायम होता. पण 2014 निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षासंदर्भात त्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. अरुणाचलप्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड याठिकाणचे राष्ट्रवादीचे अस्तित्व कमी झालेले आहे.
दरम्यान, भाजपासह राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला नेटिझन्सकडून ट्रोल करण्यात येत आहे. याबाबत आमदार मिटकरी यांनी भाजपा समर्थकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.