breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आम्हाला गृहित धरू नका’; ऐनवेळी मनसे आमदारानी वाढवला सस्पेन्स

डोंबिवली : राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील चांगलेच चर्चेत आले होते. या निवडणुकीत पाटील यांनी भाजप उमेदवाराला मत दिल्याची चर्चा होती. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही त्यांचा कल भाजपकडे असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र काही वेळापूर्वीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत राजू पाटील यांनी विधानपरिषदेबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. आम्हाला कोणी गृहीत धरू नये, असं आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे. आमदार पाटील हे काही वेळापूर्वी विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

‘आम्ही भाजपला मतदान करणार आहोत किंवा दुसऱ्या पक्षाला मतदान करणार, हे कोणी गृहीत धरू नये. मागच्या वेळीही आम्ही व्यक्ती बघून आम्ही मतदान केलं होतं. राज्यसभेवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ज्यांनी विनंती केली होती, त्यानुसार मी मतदान केलं होतं. लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य असते. तुम्ही मागील निवडणुकीतही पाहिलं असेल एका मताची किंमत किंवा त्याला किती महत्व असते. त्यामुळे मी राज साहेबांना रात्रीच भेटायला गेलो होतो. त्यांनी मला काही निर्देश दिलेले आहेत, त्या निर्देशानुसार मतदान होईल,’ अशी माहिती राजू पाटील यांनी दिली.

  • राज ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी काय म्हणाले आमदार पाटील?

    राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया पार पडत आहे. याविषयी बोलताना राजू पाटील म्हणाले की, ‘राज ठाकरे यांची तब्येत चांगली आहे. गप्पा-टप्पा सुरू होत्या. ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. मी मतदान करून पुन्हा त्यांना भेटायला जाणार आहे,’ अशी माहिती पाटील यांनी दिली.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button