breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

‘माझं एक काम करा, घरोघरी जा आणि सांगा मोदीजी कोल्हापुरात…’; पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

कोल्हापुर : सरकारमध्ये आल्यानंतर काँग्रेस काश्मीरमध्ये आर्टिकल ३७० परत बहाल करणार आहे. तसा काँग्रेसचा अजेंडा आहे. मोदींचा हा निर्णय मागे घेण्याची कुणात हिंमत आहे का? ते असं करायला गेले तर त्यांची काय अवस्था होईल त्यांना माहीत नाही का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जोरदार सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या मतदारांना आवाहनही केलं. माझं एक काम करा. घरोघरी जा. सांगा मोदी कोल्हापुरात आले होते. मोदींनी नमस्कार सांगितला म्हणून सांगा. त्यांना निरोप द्या त्यांचे आशीर्वाद मिळेल. तुमचं स्वप्न हेच माझं स्वप्न आहे. माझा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आहे. माझा प्रत्येक क्षण देशासाठी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी त्यांनी अत्यंत विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. कोल्हापूरकर फुटबॉल प्रेमी आहेत. जगात भारी कोल्हापुरी, हे संपूर्ण देश जाणतो. त्यामुळे आता तुम्हाला गोल करायचा आहे. असा गोल करा की पुढचे सर्व गोल सोपे गेले पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

हेही वाचा – लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कांदा निर्यातीस परवानगी

यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. सरकारमध्ये आल्यानंतर काँग्रेस काश्मीरमध्ये आर्टिकल ३७० परत बहाल करणार आहे. तसा काँग्रेसचा अजेंडा आहे. मोदींचा हा निर्णय मागे घेण्याची कुणात हिंमत आहे का? ते असं करायला गेले तर त्यांची काय अवस्था होईल त्यांना माहीत नाही का? ज्यांचे तीन आकडी संख्येत उमेदवार निवडून येत नाही. ते इंडिया आघाडीवाले सरकारच्या दरवाज्यापर्यंत येऊ शकतात का? एक वर्षात एक पीएम असा नियम ते करणार आहे. म्हणजे पाच वर्षात पाच पंतप्रधान करणार आहेत. त्यांना सवय झाली आहे, अशी टीका त्यांनी काँगेसवर केली.

यावेळी त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोपही केला. काँग्रेसचा कर्नाटक मॉडेल आणण्याचा डाव आहे. कर्नाटकात रातोरात मुसलामानांना ओबीसी करून त्यांना आरक्षण दिलं. त्यामुळे काँग्रेसची एक जागाही निवडून येता कामा नये, असं आवाहन मोदी यांनी केलं.
शिवाजी महाराजांच्या धरतीवर औरंगजेबांना मानणाऱ्यांना ते भेटले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या मनाला वेदना झाल्या असत्या. ही नकली शिवसेना आहे, असा टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button