breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवारांची भेट का घेतली? छगन भुजबळांनी भेटीचं कारण सांगितलं..

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची’सिल्व्हर ओक’ येथे भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. जवळपास एक तास छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. यावर आता छगन भुजबळांनी सविस्तर माहिती दिली.

छगन भुजबळ म्हणाले, मी आज शरद पवारांच्या भेटीसाठी गेलो होतो. त्यांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती. मी १० वाजता गेलो. पण त्यांची तब्येत बरी नसल्याने ते आराम करत होते. त्यानंतर मग मी त्यांची भेट घेतली. यावेळी मी त्यांच्याकडे राजकीय नेता म्हणून किंवा कोणतीही राजकीय भूमिका घेऊन गेलो नव्हतो. तर राज्यातील एक जेष्ठ नेते आहेत. यासाठी गेलो होतो. मराठा-ओबीसींच्या प्रश्नांवर सध्या राज्यात स्फोटक परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात शांतता राहिली पाहिजे. यासाठी प्रयत्न केला पाहिजेत, असं सांगितलं. त्यावर शरद पवार हे दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा     –      रोहित शर्माचे वनडे-कसोटी निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, मी पुढचा.

राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही शांततेसाठी काम केलं पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की जरांगे हे मुख्यमंत्र्यांशी भेटले. पण मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या भेटीला गेले होते तुम्ही त्यांना काय आश्वासन दिलं, हे मला माहिती नाही. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले.

राज्यात ओबीसी अरक्षण देण्याचं काम पवारांनी केल आणि आता राज्यांत काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती आहे. काही लोकं मराठा समाजाकडे जात नाही तर दुसरीकडे मराठा समाज इतरांकडे जातं नाही. मी त्यांना आठवण करून दिली की, बाबासाहेब अंबेडकर नाव देण्यावेळी मराठवाडा पेटला होता त्यावेळी देखील आपण पुढाकार घेतला होता. त्यांच अस म्हणणं आहे की, आम्हाला जारांगे सोबत काय चर्चा केली हे महिती नाही. हाके, ससाणे, वाघमारे उपोषण सोडायला तुम्ही गेलात त्यावेळीं काय चर्चा झाली हे देखील मला माहिती नाही. त्यावेळी मी त्या आंदोलकांना आश्वासन दिलं की, सरकार योग्य उपाय काढेल. मी त्यांना विनंती केली की, तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे. आम्हाला सगळा अभ्यास आहे असं नाही. 50 लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button