breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“कार्यक्रम कुणाचा करायचा हे 2024 ला जनता ठरवेल”; चंद्रशेखर बावनकुळे

बारामतीचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही

घोटाळ्याचे बॉम्ब आमच्याजवळही आहेत त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद कराव्यात

नागपूर : बारामतीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत राष्ट्रावादी कॉग्रेसचं घड्याळ बंद पाडू असं थेट आव्हान दिलं होतं. या घोषणेचा विरोधीकपक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर घणाघाती टिका केली आहे.

बारामतीच्या माझ्या एका दैऱ्यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत. कार्यक्रम कुणाचा करायचा हे जनता ठरवेल. 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेद्वार देखील भेटणार नाहीत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्ररशेखऱ बावनकुळेंनी लगावला आहे.

बारामतीचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. अजित पवारांच्या वागण्याबद्दल मतदारसंघात प्रचंड नराजी आहे. त्यांचा करेक्ट कार्यक्रम 2024 मध्ये जनता करणार आहे. अजित पवारांचे कोणतेही चॅलेंज आम्ही स्वीकरायला तयार असल्याचे बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादी सत्तेत आली तरी देखील अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला नाही. ते ओबीसींचे मारेकरी आहेत, असाही आरोप बावनकुळेंनी केला आहे.

ज्यांनी 50 वर्षे सत्तेपासून पैसा कमविला. त्यांना लोकायुक्ताची भीती वाटते आहे. घोटाळ्याचे बॉम्ब आमच्याजवळही आहे. पीएमआरडीएमध्ये राष्ट्रावादीच्या नेत्यांनी किती जमिनी ग्रीनबेल्टच्या यलोबल्टमध्ये केल्या एवढी जरी मांडले तरी भरपूर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रावादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, असही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button