बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत राजकारणात प्रवेश करणार?
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेचा विषय असते. दरम्यान, कंगनाने एक मोठं विधान केलं आहे. तिने राजकारणातील एन्ट्रीचे संकेत दिले आहेत. श्री कृष्णाची कृपा असले तर लोकसभा निवडणूक लढवेल, असं कंगना म्हणाली. ती गुजरात येथील द्वारका मंदिरात दर्शनासाठी आली होती.
कंगना रनौत म्हणाली, द्वारका नगरी फार दिव्य आहे. येथील प्रत्येक गोष्ट अद्भुत आहे. माझ्या हृदयात द्वारकाधीश आहेत. द्वारकाधीशांचं दर्शन झाल्यानंतर मला प्रसन्न वाटतं. द्वारकाधीशचं दर्शन घेण्यासाठी नेहमी येथे येण्याचा प्रयत्न करते, पण ते शक्य होत नाही. सरकारने अशी सुविधा द्यावी की ज्यामुळे पाण्याखाली असलेली द्वारका पाण्यात जावून पाहाता येवू शकेल..भगवान श्रीकृष्णाची नगरी आपल्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही.
हेही वाचा – ‘मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतच मुदत’; मनोज जरांगे पाटील यांचं विधान
कंगनाला राजकारणातील प्रवेशाबद्दल विचारले असता. ती म्हणाली, जर श्री कृष्णाची कृपा असेल तर लोकसभा लढवेल.
६०० वर्षांच्या संघर्षानंतर राम यांचा जन्म दिवस भारतीय वर्षात साजरा करण्याचा भाजप सरकारचा मानस आहे. मोठ्या थाटामाटात मंदिराची पुनर्स्थापना करू, असंही कंगना रनौत म्हणाली.