ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली जहरी टीका

पाकिस्तानी एजंट,लाथ मारून मातोश्री बाहेर काढले असते

मुंबई: गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. पुतळा कोसळल्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मविआ नेत्यांनी काल सरकारला धारेवर धरलं. उद्धव ठाकरे हे पाकिस्तानी एजंट असल्याचे म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. औरंग्याच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या.

उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. एवढंच नव्हे तर , बाळासाहेब ठाकरे कडवट हिंदू होते. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त असूच शकत नाही. बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरेला लाथ मारून मातोश्री बाहेर काढले असते’ अशा शब्दांत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केल्याचे पाहायला मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button