breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मोठी बातमी! शिवसेनेच्या अर्जावर आज संध्याकाळी ५ वाजताच होणार सुनावणी- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचे आदेश दिल्यानंतर या आदेशाविरोधात शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. यावेळी शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात त्यांचा अर्ज आणि महाराष्ट्रातील घडामोडींची माहिती देऊन तातडीची सुनावणी घेण्यासाठी विनंती केली. त्यानंतर शिवसेनेच्या अर्जावर आजच सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाने निश्चित केले आहे. संध्याकाळी ५ वाजता याबाबत सुनावणी होणार आहे.

शिवसेनेनं बहुमत चाचणीच्या आदेशाला आव्हान दिल्यानंतर बंडखोर आमदारांच्या वतीने ज्येष्ठ वकील कौल यांनी म्हणणे मांडले. ‘राज्यपालांचे अधिकार आणि त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या अधिवेशन बोलावण्याचा दिलेला आदेश हा पूर्ण वेगळा विषय आहे. त्याचा विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर आमदारांना दिलेल्या नोटिशीच्या प्रकरणाशी काही संबंध नाही,’ असं वकील कौल म्हणाले. याला शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी तीव्र आक्षेप घेतला.

‘एकीकडे ज्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ११ जुलै रोजी सुनावणी ठेवली असताना राज्यपालांनी घाईघाईत अधिवेशन बोलावण्याचा आदेश दिला आहे. ही राज्यघटनेचीच पायमल्ली आहे. याबाबतची भीती आम्ही त्यादिवशीच बोलून दाखवली होती,’ असे सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्य कांत व न्यायमूर्ती जे. बी. पर्डीवाला यांच्या खंडपीठाने आजच संध्याकाळी शिवसेनेच्या अर्जावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले. त्यादृष्टीने संबंधित सर्व कागदपत्रे राज्यपाल, बंडखोर आमदार, राज्य सरकार यांच्या वकिलांना दुपारी ३ वाजेपर्यंत देण्याचे निर्देश खंडपीठाने सिंघवी यांना दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button