breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘संभाजी भिडेंना सहा महिने तरी देशाच्या बाहेर ठेवा’; बच्चू कडू यांची मागणी

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले आणि साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच त्यांना सहा महिने तरी देशाच्या बाहेर ठेवा, अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, संभाजी भिडे यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत. तिरंग्याचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. संभाजी भिडेंना बेड्या ठोकल्या पाहिजेत. हे जर थांबलं तर संभाजी भिडे विरोधात आम्ही रोखठोक भूमिका घेऊ. सहा महिने तरी संभाजी भिडे यांना देशाच्या बाहेर ठेवलं पाहिजे.

हेही वाचा – ‘आम्ही तिघांनी ठरवलं तर..’; शरद पवार याचं सूचक विधान

संभाजी भिडे यांचं स्वातंत्र्यामध्ये योगदान काय आहे? कधी लाठी तरी खाल्ली आहे का? अशा प्राकारे बोलत असेल तर त्यांच्या नांग्या तिथेच ठेचल्या गेल्या पाहिजेत. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी यावर बोलले पाहिजे, असंही संभाजी भिडे म्हणाले.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवायचे हे शिकवण्यासाठी देशात सुधारक नावाची जात निर्माण केली. निवडक लोकांना सुपर समाजसुधारकांच्या पदव्या देऊन तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले. त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशताली भारतप्रसाद मिश्रा, बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, तामिळनाडूतील रामास्वामी नायकर आणि महाराष्ट्रात महात्मा फुले यांचा सामवेश होता. या सगळ्यांच्या ढुंXX देशद्रोहाचे शिक्के असून माझ्याकडे त्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. यावर मी दोन तास भाषण करून मोठे खुलासे करू शकतो. आपला हिंदू समाज ज्या साईबाबाला पुजतो, त्या साईबाबाची लायकी काय ते तपासा. सर्वप्रथम त्या साईबाबाला घरातील देव्हाऱ्यातून बाहेर फेका. लक्षात ठेवा मी काय बोलतोय, मी काही डोके सटकलेला माणूस नाही, मी हे सर्व जबाबदारीने बोलतोय, हे लक्षात घेऊन त्याला हिंदूचा देव मानू नका, असंही संभाजी भिडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button