आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३५० हून अधिक जागा जिंकेल; केंद्रीय मंत्र्यांचा दावा
नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील
![Ashwini Kumar Choubey said that BJP will win more than 350 seats in the Lok Sabha elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/amit-shah-and-narendra-modi-780x470.jpg)
मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) ३५० हून अधिक जागा जिंकेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असा दावा केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केला आहे. भ्रष्ट नेते एकजुटीने देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही ते म्हणाले.
अश्विनी कुमार चौबे म्हणाले की, लोक पीएम मोदींसोबत आहेत हे मला माहीत नाही. २०२४ च्या निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि भाजप लोकसभेच्या ३५० हून अधिक जागा जिंकेल. चौबे यांनी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवरही हल्लाबोल केला. हेमंत सोरेन सरकारच्या काळात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असल्याचा आरोप करून ते म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. यासोबतच बेरोजगारीही वाढली आहे.
झारखंड सरकार जनताविरोधी आहे. पाच हजारांहून अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. ५,२५८ खून झाले आहेत. हत्तींच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तुटपुंजी भरपाई राज्य सरकार देत असल्याची टीका त्यांनी केली. झारखंडमध्ये फक्त ४ लाख रुपये दिले जातात, तर कर्नाटकात १५ लाख रुपये दिले जातात. आम्ही राज्य सरकारला एक्स-ग्रॅशिया रक्कम किमान ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची विनंती करतो, असं अश्विनी कुमार चौबे म्हणाले.