‘आदित्य ठाकरेंच्या गाडीवर मिंधे गटाचा हल्ला’; अंबादास दानवेंचा दावा
आदित्य ठाकरेंच्या सुरकक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंबाद यात्रेच्या निमित्ताने औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आदित्य ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत एक अतिशय अनपेक्षित घटना घडली. आदित्य ठाकरे यांच्या सभेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. यावेळी एक मोठा दगड आला होता. तसेच सभेवरून निघताना काही दगड गाडीवर आले होते, असा धक्कादायक दावा अंबादास दानवे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या सभेत अडथळे निर्माण करत दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न महालगाव (ता. वैजापूर) येथील सभेदरम्यान झाला. सरकारचे देखील आदित्यजी ठाकरे साहेबांच्या सुरक्षेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. सदर गोंधळ घालणारे मिंधे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांच्या नावाच्या घोषणा देत होते. आदित्य साहेबांच्या सुरकक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पोलीस अधिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे, असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे.
दरम्यान, आदित्या ठाकरे यांनी सभेदरम्यान गोंधळ होताच जमावाला तातडीने शांत होण्याचं आवाहन केलं. भीमशक्तीची मिरवणूक सुरू आहे. त्यांचीदेखईल मिरवणूक होऊ द्या. म्युझिक चालत असेल तर चालूद्या. एक गोष्ट आहे, शिवशक्ती आणि भीमशक्ती वाद नको. आपण एकत्र आलो आहोत आणि देशासाठी एकत्र आलो आहोत, असं आदित्या ठाकरे म्हणाले.