breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही शंकराचार्यांचा विरोध? नेमकं कारण काय?

Ram Mandir Ayodhya | २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही शंकराचार्यांनी विरोध केला असल्याच्या बातम्या माध्यमांत येत आहेत. मात्र दोन शंकराचर्यांन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, द्वारिकापीठ आणि शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तर पुरी गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनीही या सोहळ्याला पाठिंबा दिला आहे. मात्र ते आता सोहळ्यास उपस्थित राहणार नसून योग्य वेळी दर्शन घेण्यास येतील. बाकी तीनही शंकराचार्य हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे समर्थन करत आहेत. मात्र त्यांच्या भूमिकेचे चुकीचे आकलन माध्यमांनी केले, असं त्यांनी सांगितले.

हेही वाचा   –    मोशीतील अतिउच्चदाब वीज उपकेंद्राच्या जागेचा प्रश्न सुटणार!

शंकराचार्य नेमकं काय म्हणाले?

सनातन धर्माच्या अनुयायांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. द्वारिकापीठाच्या शंकराचार्यांनी लेखी निवेदन जाहीर करून म्हटले की, माध्यमात माझ्या नावाने प्रसिद्ध झालेली विधाने माझ्या परवानगीविना छापली गेली आहेत, असं शृंगेरी शारदा पीठाचे स्वामी भारतीकृष्ण तीर्थ आणि द्वारिकापीठाचे स्वामी सदानंद सरस्वती म्हणाले.

शंकराचार्य हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विरोधात असल्याची विधाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी अशा प्रकारचे कुठलेही विधान केलेले नाही. धर्मविरोधी शत्रूंनी जाणूनबुजून हा कांगावा केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मी या सोहळ्याला शुभेच्छा देतो, असं शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button