मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवरांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला
![Ajit Pawar slams Shinde-Fadnavis government over cabinet expansion](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/ajit-pawar-eknath-shinde-and-devendra-fadnavis-780x470.jpg)
मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची सरकारला भीती
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. हे सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले असले, तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.
बंडखोरी केलेल्या प्रत्येकाला मंत्रिपदाचे गाजर दाखवले होते. मंत्रिपदाच्या आशेने 40 बंडखोर आमदारांपैकी बऱयाच जणांनी नवीन सूट शिवून घेतले. या सूटची घडी कधी मोडणार, असा सवाल त्यांच्या बायका विचारत आहेत. मंत्रिपदासाठी त्यांनी नवस केले, अभिषेक केले; पण नवस फेडायला अजून मंत्रिपद काही मिळाले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची सरकारला भीती वाटत आहे. राज्याची अशी अवस्था यापूर्वी कधीही पहिली नव्हती, अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
जे शिवसेना सोडून गेले ते आजपर्यंत कधीच परत निवडून आले नाही, हा इतिहास आहे. जे सत्त्तेसाठी गुवाहाटी,गोव्याला पळून गेले होते त्यांनी त्याच वेळी राजीनामा देत परत निवडून येण्याची हिंमत दाखवायला हवी होती, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली, असं अजित पवार म्हणाले.
सरकार येतात व जातात. कोणीच सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, असेही अजित पवार यांनी राज्य सरकारला सुनावले.