महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील उष्माघात प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय!
![A big decision by the state government after the heatstroke case at the Maharashtra Bhushan award ceremony](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/devendra-fadnavis-and-eknath-shinde-780x470.jpg)
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबईमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, भर दुपारी हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात १२ श्रीसदस्यांचा दुर्दौवी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दरम्यान आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊन नयेत, असं राज्या सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
खारघरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची कल्पनाही कुणी केली नव्हती. त्या दिवशी जे काही झालं, त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये म्हणून सरकारने निर्णय घेतलाय. जोपर्यंत उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते ५ वाजेच्या दरम्यान खुल्या भागात, मैदानात कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही. हा चांगला निर्णय आहे. सर्व लोकांनी यांचा पालन करायला पाहिजे, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.