breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत दाखल, आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्राचा मोठा डाव
![सीआरपीएफचे २ हजार जवान मुंबईत, आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्राचा मेगा प्लान](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/सीआरपीएफचे-२-हजार-जवान-मुंबईत-आमदारांच्या-सुरक्षेसाठी-केंद्राचा-मेगा-प्लान.jpg)
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या बंडामुळं अडचणीत सापडलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला ३० जून रोजी सामोरं जाण्याचे आदेश दिले आहेत. बंडखोर आमदार उद्या गोव्यातून मुंबईत येणार आहेत. मुंबई विमानतळावरुन बंडखोर आमदार विधानभवनात सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी केंद्र सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २ हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. तीन विशेष विमानांद्वारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान मुंबईत पोहोचले आहेत.
- २ हजार जवान मुंबईत दाखल
राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाला शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टात सायंकाळी पाच पासून युक्तिवाद सुरु आहे. शिवसेनेच्यावतीनं अभिषेक मनू सिंघवी, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून कौल यांनी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावतीनं तुषार मेहता यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. राज्यपालांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलं नसल्याचं तुषार मेहता म्हणाले.