“सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का?कशाला नौटंकी करता” इम्तियाज जलील यांची पंकजा मुंडेंवर टीका…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-132.png)
सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विचारला आहे. पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. मराठवाडय़ातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सोमवारी उपोषणाच्या समारोप प्रसंगी केली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/loksawal-Pankaja-Munde-Aurangabad-696x398-1.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/110658927_05bfa619-81da-4572-aebd-32c441e56bb3.jpg)
पंकजा मुंडे यांच्या उपोषणावर टीका करताना इम्तियाज जलील यांनी म्हटलं की, “पाच वर्ष केंद्रात आणि राज्यात जेव्हा आपल्या हातात सत्ता होती तेव्हा काय गोट्या खेळत होता का ?त्यावेळी या गंभीर प्रश्नासाठी तुम्ही काही केलं नाही. मग आता कशाला नौटंकी करता”.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/pankaja-munde-pratishanat-abd-agitation_202001361315.jpg)
“सत्ता होती तेव्हा काही केलं नाही आणि आता तुम्ही औरंगाबादमध्ये एकत्र आले आहात. आम्ही काय इतके मूर्ख नाही. जनता मूर्ख नाही. मी विरोधी पक्षात असूनही हे प्रश्न विचारत आहे. जेव्हा सत्ता होती तेव्हा का नाही केलं आणि आता सत्ता गेल्यावर हे नाटक आणि नौटंकी कशासाठी हा प्रश्न तुमचे जे समर्थक आहेत तेदेखील विचारतील,” असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.