breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

वाधवान कुटुंबियांना सीबीआयच्या ताब्यात देणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई | गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालघर मॉब लिंचिंग घटना आणि लॉकडाऊन नियम तोडणाऱ्या वाधवान प्रकरणावर भाष्य केले. वाधवान कुटुंबियांचा क्वारंटाईन कालावधी आज संपतोय. असताना त्यांना सीबीआयच्या ताब्यात देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

सध्या त्यांना महाबळेश्वर येथील जवळच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज दुपारी वाधवान कुटुंबियांना सीबीआयच्या ताब्यात देण्यात येईल. पालघर मॉब लिंचिंग घटनेवर देखील गृहमंत्र्यांनी यावेळी भाष्य केले. ही घटना झाल्यानंतर ८ तासांच्या आत १०१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही मंडळी पळून जाण्याचा आणि लपण्याचा प्रयत्न करत होती. पण पोलिसांनी सतर्कता दाखवत यांना ताब्यात घेतले आहे. या १०१ लोकांची यादी गृहमंत्र्यांनी जाहीर केली. यामध्ये एकही व्यक्ती मुस्लिम समाजाचा नव्हता असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. असे असताना देखील या घटनेला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न झाला ही दुर्देवाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत असताना काहीजण राजकारण करत असल्याचे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button