breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा गैरव्यहार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
मुंबई: राष्ट्रीय आरोग्य मिशन योजना अंमलबजावणीच्या नावाखाली तब्बल 300 ते 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी करत फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्रही लिहीलेले आहे.