breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

योगींनी जनरल डायर बनण्याचा प्रयत्न करू नये, हे सहन केलं जाणार नाही; नवाब मलिक यांचा इशारा

दिल्ली | महाईन्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ”मरण्यासाठी येतील तर जीवंत कसे जातील” योगींनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावरून मलिक यांनी त्यांना जनरल डायर बनण्याचा प्रयत्न करू नका, हे सहन केलं जाणार नाही, असं म्हटलेलं आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं, ”मरण्यासाठी येतील तर जीवंत कसे जातील” हे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे.

राज्यातील सर्व लोकांना समान वागणूक देणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आंदोलन करणं हा लोकांचा अधिकार आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या पोलिसांना सातत्याने गोळीबार केला आणि योगीची म्हणतात की मरण्यासाठी आले होते. यातून त्यांना हा संदेश द्यायचा आहे का? की सरकार विरोधात कोणी आंदोलन करण्यासाठी आलं तर त्यांना गोळीने उडवून देऊ. मला असं वाटतं की त्यांनी जनरल डायर बनण्याचा प्रयत्न करू नये, ही लोकशाही आहे. लोकशाहीत एका बटनाने सरकारं बदलतात. जेव्हा पण निवडणुका होतील, तेव्हा जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेन. असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button