breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
भारत बंद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात ‘ही’ आहे सरकारची नैतिक जबाबदारी!
![What exactly happened to Sharad Pawar ?; Information provided by Supriya Sule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Supriya-Sule-2.jpg)
पुणे । प्रतिनिधी
शेतकरी हा अन्नदाता आहे. समाजातील कोणत्याही घटकात जर असंतोष असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. भारत बंदला विरोधकांनी पाठिंबा दर्शवलेला असून केंद्र सरकारने यावरुन टीका केली आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केलं आहे.