breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
फडणवीस मौन सोडणार का ? : ४.३० वाजता पत्रकार परिषद
मुंबई | विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप हे पद सोडण्यास तयार नाही.
त्यामुळे अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या पद्धतीने प्रयत्न सुरू असल्याने राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. यासार्वांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४.३० वाजता आपली पुढील भूमिका मांडणार आहेत.