पाच वर्षात फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला : अनिल गोटे
धुळे | पाच वर्षात फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला असून स्वातंत्र्यानंतरचं सर्वाधिक भ्रष्ट सरकार बघितले नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांची देवेंद्र फडणवीसांवर यांच्यावर केला आहे.
तसेच मागील पाच वर्षात सरकारी कामात हजारो कोटींचे घोटाळे झाले. शिवस्मारक, समृद्धी महामार्ग या कामांत घोटाळा केला असल्याचा आरोपही गोटेंनी केला. राज्यातील प्रत्येक गावात यांनी गोंधळ घातला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. देवेंद्र फडणवीस खरे असते तर आत्ता राज्यात उठाव झाला असता. ज्या अर्थी लोक शांत आहेत त्या अर्थी राज्यात लोकांच्या मनातील सरकार आले असल्याचे अनिल गोटे म्हणाले. देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळत नाही. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, पण हा फक्त गुंडाचा पक्ष राहिला असल्याची गंभीर टीका अनिल गोटे यांनी केली.