परवेझ मुशर्रफ यांना भारताचे नागरिकत्व द्या- सुब्रह्मण्यम स्वामी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/new-5.png)
देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या परवेझ मुशर्रफ यांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे अशी मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.परवेझ मुशर्रफ हे मुळचे दिल्लीचे आहेत त्यामुळे त्यांना भारताने नागरिकत्व द्यावे अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.
देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथणे, न्यायाधीशांना अटक करणे असे आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानातील न्यायालयात ठेवण्यात आले होते.देशामध्ये सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आरोप-प्रत्यारोप, आंदोलने, निदर्शनांचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी ट्विटरवरुन मुशर्रफ यांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे.
खटल्यामध्ये वेळकाढूपणा करून वेळ वाया घालवल्याबद्दल या दोषीचे वकील ए. पी. सिंह यांना न्यायाधीश सुरेश कैत यांनी 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यांच्यावर बार कौन्सीलने कारवाई करावी असेही न्यायाधीशांनी आदेश दिले आहेत. ही बातमी एका हिंदुस्थान टाइम्सने प्रसिद्ध केली आहे. मात्र परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती होते. त्यांची सत्ता होती त्यांनी अनेक वेळा भारताच्या विरोधात कटकारस्थान केल्याचंही बोललं जात असताना त्याचं व्यक्तीला भारताचं नागरिकत्व देण्याचा निर्णय योग्य असू शकतो का ? असा प्रश्न उपस्थित होतो. अशी विनंती भाजपाच्या खासदारानं करावी हे नवलं.