देशात मेट्रो सेवा सुरू होणार, पण महाराष्ट्रात मात्र मेट्रोला रेड सिग्नल!
नवी दिल्ली: देशात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने मेट्रो सेवा सुरु करण्याला परवानगी दिली आहे. देशाल्या 18 शहरांमधल्या 12 मेट्रो सेवा सुरु होणार असून 7 सप्टेंबर पासून त्याची सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी दिलेली आहे. मात्र महाराष्ट्रातल्या सेवेचा निर्णय हा राज्य सरकार घेणार असल्याचं पुरी म्हणालेले आहेत. राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यांपर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.
त्यामुळे त्यानंतरच निर्णय होईल असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे. मेट्रो सुरु करण्यासाठी नियमावली केली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच समोर आलेली काही आकडेवारी ही दिलासा देणारी आहे. रुग्णांची संख्या वाढत असली असली तरी मृत्यूदर हा जगात सर्वात कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलेलं आहे.