दिलेला शब्द पाळायचा, हे माझं तत्व आहे – आमदार भास्कर जाधव
मुंबई |महाईन्यूज|
मला पक्षप्रमुखांकडून समजून घ्यायचे आहे. मी कुठे कमी पडलो. माझी निष्ठा कुठे कमी पडली, हे मला जाणून घ्यायचे आहे. मात्र, दिलेला शब्द पाळायचा हे माझं तत्व आहे. असे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे जाधव हे नाराज असल्याचे बोलले जाते, त्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी कोणावर नाही स्वतःवरच नाराज आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मी राजकारणात आहे. सहावेळा आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिलो. मी राजकारणात नवा नाही, मी पूर्वी राष्ट्रवादीत होतो. नंतर शिवसेनेत आलो.
माझा मंत्रिमंडळात समावेश असेल असा विश्वास मलाच नव्हे तर इतरांनाही होता. संघर्ष करायचा असो किंवा पक्ष संघटना मजबूत करायची असेल तर तेव्हा भास्कर जाधवच असू शकतो. पण माझे नाव मंत्रिमंडळ विस्तारात न आल्याने मलाही आश्चर्याचा धक्का बसला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा मला अभिमान आहे, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत