breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
…तर सीबीआय पथकाला क्वारंटाईन करणार नाही, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/iqbal-chahal-and-Sushant.png)
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे. याप्रकरणातील सर्व पुरावे मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
“या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक मुंबईत सात दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आलं तर त्यांना क्वारंटाईन केलं जाणार नाही. मात्र, सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी सीबीआयचे अधिकारी मुंबईत येतील तर त्यांना मुंबई महापालिकेला ईमेल करुन क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी अर्ज कारावा लागणार आहे. त्यानंतर आम्ही त्यांची क्वारंटाईन पीरियडमधून सूट देऊ”, असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल म्हणालेले आहेत.