breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
कॉलेज निवडणुका सुरू करण्याची राष्ट्रवादीची मागणी;उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांची घेतली भेट
मुंबई | महाईन्यूज
कॉलेज निवडणुका बंद करून लोकशाही निवडणूक ही प्रक्रिया थांबणे योग्य नाही. या निवडणुका पुन्हा सुरू करण्याची काळजी राज्य सरकारने घ्यावी आणि विद्यार्थ्यांना निवडणूकीची संधी द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच मुंबई मधील “युवा संवाद” कार्यक्रम मध्ये केलेले होते.
आगामी शैक्षणिक वर्षापासून कॉलेज निवडणुका सुरू करण्याची मागणी प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अँड.अमोल मातेले यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मंत्री महोदयांची काल भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्याची माहिती मातेले यांनी वृतापात्राना दिलेली आहे.