breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांना आणखी किती दिवस दिवसाआड पाणी? प्रशासनाने दिली माहिती

पिंपरी | पिंपरी-चिंचवडकर मागील चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. आणखी वर्षभर दररोज पाणीपुरवठ्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. २०२५ पर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याच्या तक्कारी वाढल्याने समान पाणीपुरवठ्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. काही दिवसांसाठी सुरू केलेला असा पाणीपुरवठा चार वर्षे झाले, तरी कायम आहे.

दिवसाला ५९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

शहरवासीयांना पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दिवसाला पवनातून ५१०, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून ७० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) १५ असे ५९५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते.

हेही वाचा     –      आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

उन्हाळा सुरू होताच पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ सुरू झाली आहे. शहराच्या विविध भागांतून कमी दाबाने, अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच आठवडाभरापासून वाकड रस्त्यावरील एकता कॉलनी, गणेश कॉलनी, मंगलनगर या भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

चिखलीला नदीतील पाणी कमी झाल्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. दोन दिवसांत त्या कमी केल्या जातील. पवना धरणात ५८ टक्के पाणीसाठा असून, जूनअखेरपर्यंत पुरेल. त्यामुळे पाण्याची चिंता नाही, असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button