breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

स्वार्थासाठी एकत्र येताना, यांना ‘लाज कशी वाटत नाही’ -राष्ट्रवादीचा आरोप

  • फोटोवाला, पत्रकबाजीवाला, पडीक उमेदवारांशी मनोमिलन करताना लोकांना वेढे समजता का?
  • सार्वजनिक कामांच्या चाैकशीचे आरोप मागे कसे घेणार, चाैकशाही थांबविणार का?

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पंतप्रधान आवास योजना प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी, 420 कोटी रस्त्यांच्या कामात रिंग, कचरा निविदा, शितलबागचा स्कायवाॅक यासह विविध विकास प्रकल्पांमध्ये सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर शिवसेना खासदारांनी भ्रष्टाचारांचे आरोप करुन पत्रक देवून चाैकशी करायला लावली, त्यामुळे सार्वजनिक कामांवर केलेले आरोप मागे कसे घेणार?, त्या प्रकल्पांच्या चाैकशी थांबविणार काय?, विशेषता भाजपनेही शिवसेना खासदारांवर फोटोवाला, पत्रकबाजीवाला आणि पडीक उमेदवार म्हणून हिणविले, अशा प्रकारे आरोप-प्रत्यारोप करुन मनोमिलन कधी होत नसते. त्या दोघांनी विकास कामाकरिता नव्हे तर स्वार्थासाठी एकत्र यायला, यांना ‘लाज कशी वाटत नाही’ असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी स्थायी सभापती डब्बू आसवानी उपस्थित होते. वाघेरे म्हणाले की, आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यांचे मनोमिलन हा त्या दोघांच्या गुणदोषांसह झाले आहे का?, या मनोमिलनाचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही, तु मारल्या सारखं कर, मी रडल्या सारखं करतो, असं दोघाचं चालू आहे. असेही म्हणाले.

प्रशांत शितोळे म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात खासदारांनी केलेली विकास कामेही दुर्बिणीने शोधत लागत आहेत. या दोघांच्या दिखाव्याच्या मनोमिलनाने खासदार बारणेंचे कामच झाले आहे. खासदार बारणेंनी विकास कामांतील भ्रष्टाचाराचे केलेले आरोप हे आमदार जगतांपाने उद्देशून होते. मग ते आरोप कसे काय, मागे घेणार आहेत.

तसेच शिरुर लोकसभेचे खासदार शिवाजी आढळरावांनी भोसरीचे आमदार महेश लांडगेंना उद्देशून वेस्ट टू एनर्जी, शितलबागचा स्कायवाॅक, समाविष्ट गावातील रस्त्यांच्या कामांतील रिंग, कचरा निविदेतील भ्रष्टाचाराचे आरोप आदीं विकास कामांतील भ्रष्टाचारावर केलेले आरोप आहेत. त्या कामांच्या चाैकशी करण्यास पत्रकेही पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि स्थानिक आयुक्तांकडे दिलेले आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. ते आरोप आता मागे कसे घेणार? हा खरा सवाल आहे. त्यामुळे भाजपवर शिवसेनेने वाट्टेल ते भ्रष्टाचाराचे आरोप हे वैयक्तिक नव्हते. सार्वजनिक कामाचे आरोप मागे घेता येत नसून लोकांना वेढे समजता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button