स्वच्छता दूतांच्या योगदानामुळेच शहराच्या सौंदर्यात भर – श्रीनिवास दांगट
– आरोग्य खात्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
पिंपरी | प्रतिनिधी
कर्म हेच देव मानून स्वतःच्या शरीराची तमा न बाळगता प्रामाणिकपणे कर्तव्य बाजावित योगदान देणाऱ्या स्वच्छता दूतांमुळेच शहर स्वच्छ राहते,. त्यामुळेच शहराच्या सौंदर्यात भर पडते, असे प्रतिपादन सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी थेरगाव येथे केले.
महापालिकेच्या आरोग्य खात्यातील थेरगाव विभागात गेली ३३ वर्ष सेवा देणाऱ्या सफाई कामगार कांताबाई अजिनाथ साळवे व ताराबाई प्रकाश लोंढे ह्या सेवानिवृत्त झाल्या त्यांच्या निरोप समारंभार ते बोलत होते.
यावेळी नगरसेविका झामाबाई बारणे, सहायक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी बाळासाहेब साठे, महापालिका कर्मचारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढगे, संचालक नाथाभाऊ मातेरे, आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल, शेखर निंबाळकर, सदाशिव पुजारी, अतुल सोनवणे, सतीश हिंगेवाड, अजिनाथ साळवे यांच्यासह सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दांगट म्हणाले की, या स्वच्छता दूतांमुळेच आपण शहरात मोकळा श्वास घेऊ शकतो. बिंनदास्त वावरू शकतो. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून ते शहाराचीही मनापासून सेवा ते करतात. कोरोना संकटात देखील त्यांनी दिलेलं मौल्यवान योगदान विसरता येणार नाही.
झामाबाई बारणे व संतोष बारणे यांनी साळवे व लोंढे यांच्या कामाचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.