स्थलांतरित कामगारांनी पायी जाऊ नये : मेधा पाटकर
विविध ठिकाणच्या कामगारांशी केली चर्चा
पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड सह पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या कामगारांनी ,स्थलांतरीत कामगारांनी गावी परतत असताना , परराज्यात परतत असताना पायी चालत न जाता उपलब्ध असलेल्या बस- रेल्वे चा वापर करून आपल्या मूळगावी परतावे असे आवाहन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज केले यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इब्राहीम खान, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार,उमेश डोर्ले,नाना कसबे, इरफान चौधरी, अर्चना कांबळे, सुमन अहिरे , तुकाराम माने आदिसह विविध ठीकाणचे कामगार उपस्थित होते.
मेधाताई पाटकर यांनी पिंपरी-चिंचवड सह पुणे शहरातील स्थलांतरित कामगार ,कष्टकरी कामगार, मजूर , घरेलू कामगार , फेरीवाला अशा सर्व असंघटित कामगारांची संवाद साधून चर्चा केली आणि त्यांना मिळणारे वेतन, ठेकेदाराकडून झालेली फसवणूक आणि रेशनिंग व्यवस्था यावर चर्चा केली .
मेधाताई मेधा पाटकर पुढे म्हणाल्या की रेशन व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे प्रत्येकाला राशन मिळाले पाहिजे. केंद्र व राज्य सरकार या साठी अनुकूल असून सुद्धा प्रत्यक्षात दुकानदाराकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही आणि कामगारांच्या हक्काच रेशन मिळत नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे त्याचबरोबर कामगारांनी रेशनिंग व्यवस्थेत बदल असणाऱ्या तक्रारी मांडल्या पाहिजेत
शहर आणि जिल्ह्याच्या परिसरामध्ये विविध ठिकाणी पायी चालत जाताना कामगारचे दिसत आहेत त्यांना कार्यकर्त्यांनी व प्रशासनाच्या प्रतिनिधीने संबंधित पोलिसाना संपर्क करुन त्यांना इच्छित स्थळी पाठवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
या पायी चालण्याचा कारणांमुळे विविध ठिकाणी अपघात होऊन बहुतांशी वेळा अनेक जखमा होऊन अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत अपघातातही अनेक कामगारांचे मृत्यू झालेले आहेत हे टाळले गेले पाहिजे, कामगारांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्याची शासनाने व्यवस्था करणे गरजेचे आहे असेही मेधाताई पाटकर म्हणाल्या