वाकड : कस्पटे वस्तीत शिवभक्तांचा संताप, जय भगवान गोलयच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200112-WA0020.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
”आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या हेतुपुरस्सर लिहिलेल्या पुस्तकाच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळत आहे. पंतप्रधान मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने संताप व्यक्त होत आहे. भाजप आणि जय भगवान गोयल यांच्या निषेधार्थ रविवारी (दि. १३) सायंकाळी वाकड येथील कस्पटे वस्तीत जोरदार नारेबाजी करण्यात आली. शिवभक्तांकडून जय भगवान गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर संपत कस्पटे, समीर कस्पटे, हिंदुराव कस्पटे, रोहित अत्रे, तानाजी अत्रे, प्रकाश पाले, रामचंद्र कदम, सुरेश कस्पटे, ॠषिकेश कस्पटे, राजेंद्र साबळे, सागर कस्पटे, विजय गवारे, शंभूराजे कस्पटे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
ज्ञानेश्वर कस्पटे म्हणाले की, भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहेत. मोदींची महाराजांशी तुलना करणाऱ्या मोदी भक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपली किती घृणा आहे. हे दाखवून दिले आहे. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या आमच्या छत्रपतींची बदनामी करणाऱ्यांनी अनाजी पंतांचा इतिहास आठवावा, अशा माथेफिरुंची गय केली जाणार नाही, असा इशारा कस्पटे यांनी भाजपला दिला आहे.