रावेत पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत; विस्कळीत पाणीपुरवठ्यासाठी महावितरण जबाबदार नाही!
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा महावितरणकडून सुरळीत आहे. मात्र, महापालिकेकडून या केंद्रातील अंतर्गत विद्युत विषयक दुरुस्ती कामासाठी गुरुवारी (दि. 3) सुमारे आठ तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यासाठी महावितरण जबाबदार नाही.
रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शनिवारी व रविवारी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून समाज माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, रावेत जलउपसा केंद्राचा वाढीव विजभाराचे काम करण्यासाठी महानगरपालिकेकडून गुरुवारी (दि. 3) सकाळी दहा वाजता विद्युत विषयक काम सुरू करण्यात आले व सायंकाळी साडेसहा वाजता हे काम पूर्ण झाले. या कालावधीत महानगरपालिकेच्या मागणीनुसार, महावितरणकडून जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता व या कालावधीत पंपिंगही बंद होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.4) रात्री अकरा वाजता रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला होता. मात्र, महावितरणने लगेचच तांत्रिक उपायोजना करून पन्नास मिनिटांनी पर्यायी व्यवस्थेद्वारे या केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तो 50 मिनिटांचा अपवाद वगळता महावितरण कडून रावेत गेलो कसा केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत विस्कळीत होण्यासाठी जबाबदार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.