राज्याला लॉकडाऊन पुन्हा परवडणारे नाही – खासदार श्रीरंग बारणे
दिघी शिवसेना शाखा आणि वाळके प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर; 603 बाटल्यांचे संकलन
पिंपरी | प्रतिनिधी
कोरोना कोविड -19 या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाटी सर्वप्रथम महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहिर केले. त्यानंतर देशभर लॉकडाऊन केले. नुकतेच युरोपातील अनेक राष्ट्रांनी पुन्हा लॉकडाऊन केले आहे. परंतू महाराष्ट्राला आता लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यासाठी आपण सर्वांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा, गर्दित जाण्याचे टाळा असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिघी येथे केले.
शिवसेना शाखा दिघी आणि तानाजी सोपानराव वाळके व सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिघी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, माथाडी मंडळ सल्लागार समिती सदस्य व कामगार नेते इरफान सय्यद, माजी सरपंच साहेबराव वाळके, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, आयोजक संतोष तानाजी वाळके, सारिका संतोष वाळके, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.
सर्व सहभागी रक्तदात्यास हेल्मेट, पाण्याचा जार, हेडफोन भेट या पैकी एक वस्तू भेट देण्यात आली. दिघी शिवसेना आणि वाळके प्रतिष्ठान तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे डिजिटल व रेड प्लस रक्तपेढीचे सहकार्याने आयोजित केलेल्या या भव्य रक्तदान शिबीरात 603 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कृष्णा वाळके, ज्ञानेश्वर वाळके, अशोक वाळके, सुरज लांडगे, किरण गवारे, राहुल गवारे, देविदास मदनकर, निवृत्ती येळवंडे, रामदास परांडे, प्रभाकर कदम, काळुराम वाळके, रमेश वाळके, अशोक वाळके, पोपट शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.