खासदारांनी गल्लीत लक्ष घालू नये, स्थानिक प्रश्न सोडविण्यास भाजप सक्षम – एकनाथ पवार
शिवसेनेच्या दोन्ही खासदारांचा घेतला समाचार
पिंपरी – गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकरांसह अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाच्या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याच्या पाठपुराव्यामुळेच शास्तीकरांचा निर्णय मार्गी लागला. शास्तीकरांचा प्रश्न भाजपने सोडविल्यामुळेच त्या कामाचे श्रेय खासदारांनी घेवू नये, तसेच खासदारांनी गल्लीतील प्रश्नामध्ये लक्ष न घातला. लोकसभेतील प्रश्न सोडवावेत, अशी उपरोधिक टीका सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली.
यावेळी महापाैर राहूल जाधव उपस्थित होते. पवार म्हणाले की, 2022 पर्यंत देशातील गरीब लोकांना घरे देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. देशभरात पंतप्रधान आवास योजनेची कामे वेगात सुरु आहे. शहरातील मध्यमवर्गीय कुटूंबाना घरे देण्यासाठी भाजप कटिबध्द आहे. पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चुकीचा आहे. त्या प्रकल्पाची सीबीआय चाैकशी केली तरी सत्य लोकांसमोर येईल, खासदारांनी विरोधाला विरोध करु नये, असेही म्हटले आहे.